Posts

Showing posts from September, 2017

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास

आयुष्याच्या विशीतला एक प्रवास ह्याला प्रवास म्हणाव की फुटक्या नशिबाच कारण म्हणावं..... एन आयुष्य संभाळत , त्याला नवीन वळणावर आणायची वेळ येते .. .. साथीला साथ देणारा कुणी तरी अचानक सोडून जातं..... मग जीवना पेक्षा मरण जवळच वाटू लागतं. शेवटी कुणीच कुणाचं नसत ह्यावर विश्वास बसतो.  कदाचित देवाने परिस्थिती हाताळण्याची मुभा माणसाला दिली असती , तर त्रासून सोडण्याऱ्या ह्या गोष्टींना आयुष्यापासू न लांब लांब सोडून ठेवलं असत.... जेव्हा कुणी सोडून जात .... मग त्यावेळी   माणसाला त्याचे सोबती ही त्रासदायी वाटतात आणि तो कागदांच्या स्वाधीन होतो.. त्यात कवी संचारतो..... त्याच्या कवीपणाला जणू ती वाव मिळावा म्हणूनच त्याच्या आयुष्यात येऊन निघून जाते......... कवितेतल्या त्या विरहित शब्दांना हिऱ्याहूनही अधिक मोल असावे... समोरच्या व्यक्तीच काळीज विघळून टाकणारे ते शब्द जणू ती त्याच्या स्वाधीन करायला आलेली असावी .. ... त्याच्यात ला कवीपणा प्रत्येक गोष्टीला अश्याप्रकारे रंगवतो की जणू ते ही त्याच्या दुः खा त शामिल आहेत... पावसालाही तो आपल्या मैफिलीत सामील करून घेतो... सर्वात

तू असतिसं तर....(कविता पाचवी)

तू असतिसं तर.... सांगायचं बरंच होतं ग तुला पण कधी सांगता आलं नाही.... तुझ्यात रमायच खूप होत मला पण कधी रमता आलं नाही...1 तुला भेटायचं ही होतं पण कधी वेळ जुळून आली नाही.... खुप काही बोलायच होत पण तू कधी ऐकून घेतलं नाहीस.....2 आठवणी बनवायच्या होत्या पण बनवता आल्या नाही.... तू समोर असतेस तरी तुझ्याशी भेटायचा धीर होत नाही.......3 मन ही तरसे नेहमी तुझा चेहरा पहायला..... आवडेल ग मला कायम तुझ्याच मनी रहायला........4 कविता पाचवी...😢 आवडल्यास नक्की share  comment  करा 

स्नेहलता (भाग तिसरा)

भाग तिसरा एक महिन्याच्या काळ तो.....आम्हा दोघांच्या नजरा ही जवळपास एक होत गेल्या, पण ह्या सर्व गोष्टी अल्पायुषी ठरल्या.... मी तिची प्रत्येक नजरभेटी जणू जपून ठेवत होतो.. कारण मी ठरवून बसलो होता... जणू ह्या गोड आठवणी पुढे आठवताना अलगद आनंद देऊन जातील... आम्ही दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असो पण मनात कधी पाहता आलं नाही...एकामागून एक दिवस उलटत गेले..आणि दुरावा निर्माण होत गेला... कुणाशी बोलताना मन घाबरतं नसे पण नेमकं स्नेहलता समोर असता आपला खेळ सुरु करायचा . मी प्रयत्न करायचो पण मन मात्र मागे ओढत असायचं.....ती समोर असूनही माझी होत नाही... अस मी म्हणत रहायचो पण प्रयत्न कधी करता आले नाही. राग तरी कुणावर कसा आणि का काढायचा हे सुद्धा कळत नव्हतं. . माणसाला वेळ गेल्यावर अक्कल येते... हे इथेही दिसून आलं... आज सर्व काही बिनसलंय... काहीच हाती उरलेलं नाही.. ती ही नाही आणि वेळ ही नाही...माझा आळशीपणा मलाच भोवला..आणि वेळ गेल्यावर तो कळतोय.. ती गेली आणि मी ही दुःखाच्या डोहात उडी मारली,... तिला स्मरून ती समोर असूनही आपली होत नाही... ह्याहून न पचणारे दुःख कुठलेच ना

निरभ्र आकाश आणि तू

निरभ्र आकाशाला ही चांदण्यांची साथ लाभते तुझ्याच आठवणींत आज  माझें जग जगते...1 चांदण्याही  रुसतात चंद्र जवळ नसताना किती गोड दिसतेस तू आजही रुसताना.....2 पहिल्या पावसात जसा फुलांना मोहोर फुलतो ....3 तुझ्या आठवणींच्या सहाऱ्यात मी तासंतास रमतो फुलांचा सुगधं जसा मोहतो तुझ्या मनाला तसा तूझ्याशिवाय अर्थच नाही माझ्या जिन्याला...4 कविता चौथी

स्नेहलता..(भाग दुसरा )

भाग दुसरा  थोडक्यात तिची वाट पाहताना                                 संध्याकाळची वेळ ती, चहाचा पेला हाती घेऊन बाल्कनीला उभा होतो. रिमझीम  पावसाच्या सरी सुरू होत्या... तेवढयात एक थेंब चहाच्या कपात येऊन विसावला...आणि तिची आठवण झाली .. पाऊस नेहमीच तिची भेट होत रहावी म्हणून मला साथ देत आला..तिच्या नजरभेटिंची चित्रफीत तिच्या अनुपस्थितीत डोळ्यांपुढून चालून येत असे...पावसाचं आणि माझं चांगलंच स्नेह वाढलं होत..पण तिच्यासोबत स्नेहवाढाव म्हणून मी आतून झालोय.. वेळोवेळी येऊन ज्या प्रकारे पाऊस दाद द्यायचा जणू तो ही मिलनाची वाट पाहत असावा, असे वाटे. आज निरोप देऊन तिसरा दिवस उलटणार होता, तिची वाट पाहणंही थांबत नव्हतं, विरहाच्या या दुर्दैवी काळाला तिने थारा द्यावा एवढीच इच्छा होती...,आजची संध्याकाळ इच्छा नसूनही विरहमय होत चालली आहे..पण पावसाच्या भेटीने थोडा धिर आला आणि तिच्या आठवणींत चहा संपला.

'ती' सोबतचा प्रवास....

Image
       आज बाहेरगावी जाण्याचा बेत चालून आला.. नशीब, इतक्या दिवसांनी का होईना आज मुहूर्त जुळून आला... सकाळ चा प्रवास होता... स्टेशन वर पोहचलो आणि 1 तास ती(रेल्वे) उशिरा येणार हे कळलं... वेळ निघावां म्हणून "सुखाचा शोध" पुस्तकातील काही भाग वाचून झाला...गाडी आली आणी खरा प्रवास सुरु झाला...           आजूबाजूच्यांच्या फोनच्या रिंग वाजायच्या आणि माझ्या काळजाचा ठोका चुकायचा... कारण पूर्वी प्रवासात असताना 'ती' चा फोन मला येत असायचा... पण आज तसलं काहीच उरलेलं नव्हतं... समोरच व्यक्ती त्याच्या 'ती' सोबत बोलताना आपण त्याला फक्त झुरून पहात रहावं आणि त्यांनी फोन खाली ठेऊन आपल्याशी बोलाव,असलं काम मी करत राहलो...पण प्रत्येकासोबत अस करणे सोप्प नव्हतं. त्यामुळे दिवसभर आपल्यासोबत अस असंख्य वेळ घडत जावं आणि आपण फक्त झुरत रहावं याची मनात पावसाच्या थेंबा एवढि भीती वाटत होती... फक्त त्या थेंबांचं तळं साचू नये.. एवढीच इच्छा...       अधून मधून माझ्या 'ती' ची आठवण होत असे, कारण इथल्या खूप काही गोष्टींनी तिच्या आठवणींनी काबीज करून ठेवल्या आहेत.. त्या वेळी मी त्यांना सांगितलं

चाहूल तुझ्या येण्याची...(कविता)

चाहूल तुझ्या येण्याची. चाहूल तुझ्या येण्याची सदैव हृदयी माझ्या राहण्याची पाऊसही वाटे किती गार गार आठवण होई तुझी वारंवार........1 दिवसही मज कमीच पडावे कितीदा नव्याने तुला आठवावे स्मरण व्हावे दिवस सरताना भूक ही हरवून जाई तुला आठवताना........2 ओढ लागे तुझ्या सहवासाची वाट पाहतोय तुझ्या येण्याची आनंद हा आभाळ भरून द्यावासा तू मज मिठी मारून........3 कविता दुसरी

स्नेहलता (भाग पहिला )

Image
भाग पहिला थोडक्यात तिची वाट पाहताना "आज मी इथेच थांबणार काळोख होई पर्यंत ... निरोप पाठवून एक दिवस संपुन पुढला दिवस सुरू होणार होता... निरोपाचा काय झालं, तिच्या पर्यंत तो पोहचता झाला की नाही, तिने त्यावर विचार केला असेल का ... अशी अनेक अनुत्तरित प्रश्न मला भेडसावत होती... मी त्यांची उत्तर शोधू तरी तशी, सोबत कुणी नव्हतं ... गरज वाटत होती कुणाची तरी.... मला तिच्याशी बोलता येत नव्हतं पण काय करू... माझ्या समोर परिस्थितीच तशी चालून आली होती... एव्हाना मी बाकीच्यांशी मन मोकळेपणाने बोलू शकत होतो, पण ती दिसताच तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि ठोके ही नुसते घाबरवून सोडायचे. धीर देणाराही कुणी सापडेना.. शेवटी एकटा जीव सदाशिव अशी गत झाली होती माझी......             तिच्या नकळत टिपलेल्या काही गोष्टी हळू हळू हरवत चालल्या होत्या .. मनात एकदम धसका आला... त्यानीही घाबरवून सोडलं.. वाटलं आपण चुकत तरी नाही आहोत ना.... मला कळत नव्हतं नेमकं कुठलं पाऊल मी उचलायला हवं....... पण एक भाभळी आशा मनात घर करून बसली होती.. ती येईल म्हणून... महिना होत आला पण आजही तिची वाट पाहण्याशिवाय दुसर काहीच माझ्या हाती न